नाशिक,१२ ऑक्टबर २०२२ – मराठी भाषेतील मनाचे पान म्हणजे शांता शेळके, दिनांक १२ ऑक्टोबर १९२२ रोजी जन्मलेल्या या प्रतिभासंपन्न मराठी कवयित्रीस आज १०० वर्ष पूर्ण होत आहे. कवयित्री बरोबरच त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. त्यांच्या कामात गीत रचना, कथा, अनुवाद आणि बालसाहित्य यांचा समावेश होता. त्यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी इंग्रजी सिनेमाचे भाषांतर करण्यासही मदत केली आणि वृत्तपत्रातील स्तंभांसाठी लेखन केले. त्यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने मुंबई, पुणे आणि नाशिक येथे एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
‘रेशमाच्या रेघांनी,’ ‘गणराज रंगी नाचतो,’ ‘तोच चंद्रमा नभात,’ ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अश्या असंख्य गाण्यांबरोबरच त्यांच्या काही निवडक कविता आणि गाण्यांचा ‘अमिथी’ प्रस्तुत “शंभरीच्या शांताबाई” हा संगीतमय कार्यक्रम विलेपार्ले, मुंबई येथे सादर झाला आणि आता खास नाशिककरांसाठी फ्रेंड्स सर्कल यांच्या सहयोगाने येत्या शनिवार दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी महाकवी कालिदास नाट्यमंदिर, नाशिक येथे हा कार्यक्रम सायं. ५:३० वाजता होत आहे. तीन तासात त्यांचा संपूर्ण जीवनपट ह्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. सशुल्क प्रवेशिका कालिदास येथे विक्री साठी उपलब्ध आहेत तसेच ऑनलाईन बुकिंग bookmyshow वर सुरु आहे. नाशिककर रसिक श्रोत्यांनी शांताबाईंच्या अजरामर गाण्यांचा मनमुराद आनंद घ्यायला जरूर यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.