नाशिक,दि.२७ मे २०२३ –कवी वसंत नारायण देशपांडे लिखित आणि ‘शब्दमल्हार’ प्रकाशित ‘रणघंटा’या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रात्मक काव्याचे प्रकाशन उद्या रविवार दि. २८ मे या दिवशी सकाळी १०:३० वाजता होणार आहे.
ख्यातनाम कीर्तनकार चारुदत्त आफळे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,तर सावरकर साहित्याचे अभ्यासक आणि वक्ते स्वानंद बेदरकर यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे.
कवी वसंत नारायण देशपांडे हे नाशिक येथे राहात होते.त्यांनी आयुष्यभर प्राथमिक शिक्षकाची नोकरी करून विद्यार्थ्यांना बालवयामध्ये सुसंस्कृत करण्याचे काम केले. त्यांची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली होती.त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी हे चरित्र काव्य लिहिले.भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल असे हे ओजस्वी काव्य असल्यानेच आज ते नसतानाही आम्ही त्याचे प्रकाशन करण्याचे ठरवले;अशी भावना त्यांच्या मुलांनी व्यक्त केली.
गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य सभागृहात होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अच्युत देशपांडे,सुनील देशपांडे आणि ‘शब्दमल्हार’प्रकाशन यांनी केले आहे.