मुंबई,दि,८ फेब्रुवारी २०२४ –विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे आता सर्व शाळांना शासन निर्णयानुसार आपल्या शाळा भरवण्याचा नियोजन करावे लागणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये रात्री उशीरा जागण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येतंय. त्यात सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप होत नाही आणि परिणामी मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे . त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी मुंबईतील ‘मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल बैस यांनी या विषयावर वक्तव्य केलं होतं.बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलेल्या असून रात्री उशिरा झोपण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. रात्री उशिरा झोपण्याच्या संस्कृतीमुळे शाळांची वेळ सकाळची असणे हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु लागलेले आहे असं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यामुळे शाळेची सकाळची वेळ बदलण्यासंदर्भात विचार करावा असं ते म्हणाले होते.
आता राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.